पंढरपूर (प्रतिनिधी ) पंढरीच्या पांडुरंगाची 17जुलै ला आषाढी वारी असून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत जिल्ह्याचे अन्न व औषध प्रशासन पंढरीतील मठ, दुकाने हॉटेल्समधील स्वच्छतेची पाहणी करीत आहेत. दुसरीकडे उपवासाचे पदार्थ, पेढे, मिठाई विक्री करणाऱ्या दुकानांमधील पदार्थांचीही तपासणी केली जात असून आतापर्यंत १०० पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रशासनाने घेतले आहेत. वारकऱ्यांना स्वच्छ व चांगले खाद्यपदार्थ मिळावेत, त्यांचे आरोग्य बिघडणार नाही यादृष्टीने जिल्ह्याचा अन्न व औषध विभाग पंढरपुरात ठाण मांडून आहे. सहायक आयुक्त सुनील जिंतूरकर, साहेबराव देसाई यांच्या
नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील, नंदिनी हिरेमठ, उमेश भुसे, अस्मिता टोणपे यांच्यासह पुणे विभागातील दहा अधिकारी देखील
खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानांसह वारी मार्गावरील हॉटेल्स, ढाब्यांची तपासणी- करीत आहेत. १७ जुलैला वारी आहे, पण ७ जुलैपासूनच हा विभाग कामाला लागला आहे. विविध दुकानांना भेटी देऊन त्यांनी आतापर्यंत जवळपास १०० नमुने तपासायला घेतले आहेत. पंढरीत वारीच्या निमित्ताने येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने हा विभाग अलर्ट मोडवर आहे.
अन्न-औषध विभागाची कामगिरी
सहायक आयुक्त 02
अन्न सुरक्षा अधिकारी 14
आतापर्यंत दुकानांची तपासणी अंदाजे 200
तपासणीसाठी घेतलेले नमुने १००
0 Comments