फलटण (विक्रम वाघमारे ) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील एसटी बस व्यवस्थेवरील दुर्लक्षामुळे महाराष्ट्रातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जगभरात आलेले कोरोनाचे संकट त्यामुळे सगळीकडे प्रवास बंदी करण्यात आली होती कोरोना काळात महाराष्ट्र शासनाने प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या काही बसेस मालवाहतुकीसाठी वापरल्या. आता कोरोना संपून २ वर्षे झाली तरीही मालवाहतुकीसाठी वापरलेल्या बसेस अजूनही तशाच उभ्या आहेत. त्या बसेस तात्काळ पूर्ववत चालू कराव्यात जेणेकरून परत खेडे वस्तीवरील जनतेला प्रवास करणे शक्य व सुलभ होईल, काही ठिकाणच्या बसेस बंद केल्या आहेत त्या परत चालू करण्यात याव्यात जर ह्या बसेस महाराष्ट्र शासनाला चालू करणे शक्य नसल्यास नवीन बसेस खरेदी करून चालू करण्यात बाबत उपविभागीय अधिकारी फलटण यांना ऍड कांचन खरात यांनी निवेदन सादर केले आहे.त्या निवेदनात
जिल्हाधिकारी व पुणे विभागीय आगार व्यवस्थापक यांनी सातारा फलटण कोरेगाव इत्यादी आगार व्यवस्थापकांना बसेस चालू करण्या बाबत आदेश द्यावा अशी मागणी केली आहे पुढे निवेदनात मालवाहतुकीसाठी वापरलेल्या बसेस तात्काळ दुरुस्त करून काही ठिकाणच्या कमी केलेल्या बसेस पूर्ववत चालू कराव्यात. जेणेकरून गाव-गड्यातील नागरिकांना प्रवास शक्य होईल तसेच नागरिकांचा त्रासही कमी होईल अशी मागणी फलटण मधील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
0 Comments