सोलापूर (प्रतिनिधी ) तरकारी वाहनातून जात असताना शनिवारी (दिनांक 4 )
हत्तूर-केगाव बायपासवर डोणगाव ब्रिजच्या बाजूच्या रोडवर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी लुटल्याची घटना समोर आली आहे. ४ मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडल्याची फिर्याद ज्ञानेश्वर राघो मरोडे (रा. रामनगर, ता. कन्नड, जि. संभाजी नगर) यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली. दरम्यान, पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयितांना जेरबंद करून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भाजीपाला विकून गावी जात असताना सलगर वस्ती परिसरातील तिघांनी वाहन अडवून ज्ञानेश्वर मरोडे या युवकाकडील दोन मोबाईल व पाच हजार रुपये काढून घेतले. दोघांनी हात पकडून
एकाने पैसे व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतले होते. काही वेळात तिघेही तेथून पसार झाले. पोलिसांत फिर्याद दाखल झाल्यानंतर फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकप्रमुख पोलिस उपनिरीक्षक गोविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार अतुल न्यामने, पोलिस हवालदार नागनाथ वाघमारे, जयभीम कांबळे, सागर बोरामणीकर, बाबूराव क्षीरसागर, दीपक साळुंखे यांच्या पथकाने संशयित आरोपींना पहाटे सहाच्या सुमारास सलगर वस्ती हद्दीतून अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता दोन मोबाईल व पाच हजार रुपये चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींचा शोध घेऊन चोरीला गेलेला
मुद्देमाल हस्तगत केल्याने फिर्यादीने पोलिसांचे आभार मानले.
0 Comments