सोलापूर (प्रतिनिधी ) गोरगरीब व गरजू लोकांना सवलतीच्या दरात जेवण मिळावे कोणीही गोरगरीब व गरजू उपाशी राहू नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यात शिवभोजन केंद्रे सुरू केले होते गोरगरीब गरजू व लोकांच्या कल्याणासाठी ही योजना राबविण्यात येत असून दोन चपाती एक वाटी डाळ एक वाटी तांदूळ असे जेवण गोरगरीब व गरजू लोकांना दिले जाते .
महाराष्ट्र राज्यातील शिवभोजन केंद्रांना शहरी भागात राज्यसरकार कडून अनुदान दिले जाते.
परिमंडळ कार्यालय क विभागातील काही शिवभोजन केंद्रात स्टीलची भांडी नसणे शिवभोजन केंद्रातील कर्मचाऱ्यांना हातमोजे टोपी नसणे स्वयंपाकासाठी फिल्टर पाणी नसणे वॉश बेसिन नसणे घरगुती गॅसचा वापर सीसीटीव्ही नसणे एकाच व्यक्तीचा अनेक वेळा फोटो काढणे त्याच बरोबर शिवभोजन थाळी पार्सल देणे तसेच शिवभोजन केंद्रात अन्न न शिजवणे असा प्रकार आढळून येत आहे काही शिवभोजन चालकांनी थाळी जास्त संख्या कागदोपत्री दाखवून राज्य सरकार कढून लाखों रुपयांची बोगस बिले लाटली आहेत अश्या अश्या शिवभोजन केंद्राची तपासणी करून त्यांचा परवाना रद्द करणे त्याच बरोबर शिवभोजन चालकावर फौंजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत परिमंडळ क विभागातील
अनेक शिवभोजन केंद्रे राज्य सरकार च्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारी आहेत
परिमंडळ क विभागा तील अनेक शिवभोजन अनेक प्रकारचे दोष आहेत अशा शिवभोजन केंद्रामुळे राज्य सरकार ला लाखों रुपयांचा अनुदान पोटी चुना लागत आहे.
राज्य सरकार ला अनुदानपोटी लाखों रुपयांना गंडवणाऱ्या शिवभोजन केंद्राची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत तपासणी करून राज्य सरकार च्या तिजोरी वर डल्ला मारणाऱ्या व शिवभोजन केंद्र चालकांवर कारवाई करावी त्याच बरोबर
परिमंडळ कार्यालय क विभागातील सर्वच शिवभोजन केंद्राच्या तपासणी साठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करून दोषी असलेल्या शिवभोजन केंद्रावर कारवाई करावी तसेच त्यांना आजपर्यंत दिलेल्या अनुदानाची रक्कम वसुल करण्यात यावी अशी मागणी पत्रकार यशवंत पवार यांनी अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर यांच्या कडे दिनांक 29/ 8 2025 रोजी लेखी पत्राद्वारे केली होती. परिमंडळ कार्यालय क विभाग नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून या कार्यालयावर अन्नधान्य वितरण अधिकारी यांचा अंकुश राहिला नसून सोलापूर शहरात परिमंडळ कार्यालय क हे मोठे कार्यालय असून परिसर व रास्तभाव धान्य दुकानांची संख्या देखील मोठी आहे या कार्यालयाचा पदभार नेहमीच अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांनाचं का दिला जातोय ? याची चर्चा आता चांगलीच रंगू लागली असून विद्यमान परिमंडळ अधिकारी यांच्याकडे परिमंडळ ड विभागाचा परिमंडळ अधिकारी म्हणून पदभार असून ते परिमंडळ क विभागाचा देखील परिमंडळ अधिकारी म्हणून काम पहात असून परिमंडळ कार्यालय क विभागात कायम स्वरूपी परिमंडळ अधिकारी नसल्याने त्याच बरोबर अतिरिक्त पदभार असलेले परिमंडळ अधिकारी त्यांच्या मर्जी नुसार व सोयी नुसार कार्यालयात येत असल्याने
सर्वसामान्य नागरिकांचे शिधापत्रिका संदर्भातील अनेक कामे रखडली आहेत अंधेरी नगरी चौपट राजा अशी अवस्था परिमंडळ कार्यालय क विभागाची झाली असून आव जाव घर तुम्हारा या म्हणी प्रमाणे लहर आली तरच परिमंडळ अधिकारी कार्यालयात येतात. परिमंडळ कार्यालय क विभागातील बोगस बिले घेऊन मलामाल झालेल्या शिवभोजन केंद्राची तपासणी व कारवाई करण्यास परिमंडळ अधिकाऱ्यांना वेळ नाही परिमंडळ कार्यालय क विभागात अनेक शिवभोजन केंद्रात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असून अश्या भ्रष्टाचारी शिवभोजन केंद्राना आशीर्वाद कोणाचा? असा प्रश्न पत्रकार यशवंत पवार यांनी प्रशासनाला विचारला असून परिमंडळ कार्यालय क विभागातील भ्रष्ट शिवभोजन केंद्राची तपासणी करून कारवाई करण्यात यावी त्याच बरोबर परिमंडळ अधिकारी क विभागाचा कारभार अन्य अधिकाऱ्यांना सोपवण्यासाठी जेष्ठ पत्रकार यशवंत पवार पुढील आठवड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी दिली आहे.
