सोलापूर (प्रतिनिधी ) वाढत्या लोकसंख्येमुळे सोलापूर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून शहराची संख्या जवळपास १६ लाख असून सोलापूर शहर हे उत्सव प्रिय शहर असून वर्षाचे बारा महिने वेगवेगळ्या स्वरूपाचे सण उत्सव साजरे होत असतात त्याचबरोबर मिरवणूक देखील मोठ्या प्रमाणात सोलापूर शहरात निघतात तसेच राजकीय सभा मेळावे बैठका त्याचबरोबर मंत्री मंडळातील मंत्री महोदय नेहमीच सोलापूरला येत असतात या सर्व बाबींचा पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण पडत असला तरी कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस प्रशासन कुठेही कमी पडलेले नाही. यापूर्वी सोलापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांच्या अडचणीचे निवारण होण्यासाठी त्याच बरोबर भांडण तंटे मारामाऱ्या रोखण्यासाठी तसेच अप्रिय घटनेला वेळीच पायबंध घालण्यासाठी सोलापूर शहरात जवळपास २३ पोलीस चौक्या उघडण्यात आल्या होत्या पण सध्या त्यातील बहुतेक पोलीस चौक्या बंद अवस्थेत आहेत यापूर्वी पोलीस चौकी आपल्या भागात असल्याने नागरिक देखील आपली तक्रार फिर्याद नोंदविण्यासाठी पोलीस चौकीत जायचे. आता परिस्थिती बदलली असून नागरिकांना आपल्या तक्रारी फिर्याद व अडचणी बाबत पोलीस स्टेशनला जावं लागत आहे सोलापूर शहरात दोन गटात हाणामारी दगडफेक चोरी घरफोडी अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे नागरिकांना मदतीसाठी अनेकदा डायल ११२ वर कॉल करावे लागत आहे सोलापूर शहराचा विस्तार वाढत्या लोकसंख्येमुळे झपाटाने वाढला असून नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशन ला जाणं खूप लांब पडत आहे अनेक नगर वस्त्यापासून पोलीस स्टेशन चे अंतर मोठे असून पोलीस स्टेशन लांब असल्यामुळे नागरिकांना आपली तक्रार फिर्याद नोंदवण्यासाठी फार मोठी पायपीट करावी लागत आहे त्याचबरोबर वेळेत पोलिसांची मदत देखील मिळत नसल्याने नागरिकांना फार मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे याबाबत पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा कार्यसम्राट न्यूज चे जेष्ठ संपादक यशवंत पवार यांनी दिनांक १०/७/२०२५ रोजी मा पोलीस आयुक्त सोलापूर तसेच दिनांक १८/७/२०२५ रोजी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र दिले होते त्याच बरोबर विभागीय आयुक्त पुणे यांची दिनांक 12/9/205 समक्ष भेट घेऊन सोलापूर शहरातील बंद असलेल्या पोलीस चौक्या सुरु करणे बाबत मागणी लावून धरली होती जेष्ठ संपादक यशवंत पवार यांच्या निवेदनाची विभागीय आयुक्त पुणे यांनी गांभीर्याने दखल घेऊन सोलापूर चे पोलीस आयुक्त यांना शहरातील बंद असलेल्या पोलीस चौक्या बाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी म्हणून दिनांक 23/9/2025 रोजी पत्र क्र सा प्र/ 4/तअ/ 679 /2025 / 5970791 या क्रमांकाचे लेखी पत्र दिले होते.
*पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा*
सोलापूर शहरातील बंद असलेल्या पोलीस चौक्या संदर्भात पोलीस आयुक्त एम राजकुमार सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष तथा कार्यसम्राट न्यूज चे जेष्ठ संपादक यशवंत पवार यांनी व्यक्त केली असून सोलापूर शहरातील बंद असलेल्या पोलीस चौक्या बाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पोलीस महासंचालक यांची मुबंई येथे भेट घेऊन सोलापूर शहरातल्या बंद असलेल्या पोलीस चौक्या पुन्हा सुरू करण्या बाबत लेखी पत्र देऊन जातीने लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याची माहिती दिली आहे.

