सोलापूर शहरातील बंद केलेल्या पोलीस चौक्या पुन्हा नव्याने सुरु करण्याची यशवंत पवार यांची पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे मागणी.

 



सोलापूर (प्रतिनिधी ) वाढत्या लोकसंख्येमुळे सोलापूर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून शहराची संख्या जवळपास 16 लाख असून सोलापूर शहर हे उत्सव प्रिय शहर असून वर्षाचे बारा महिने वेगवेगळ्या स्वरूपाचे सण उत्सव साजरे होत असतात त्याचबरोबर मिरवणूक देखील मोठ्या प्रमाणात सोलापूर शहरात निघतात तसेच राजकीय सभा मेळावे बैठका त्याचबरोबर मंत्री मंडळातील मंत्री महोदय नेहमीच सोलापूरला येत असतात या सर्व बाबींचा पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण पडत असला तरी कायदा सुव्यवस्था राखण्यात आपलं पोलीस प्रशासन कुठेही कमी पडलेले नाही . यापूर्वी सोलापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांच्या अडचणीचे निवारण होण्यासाठी त्याच बरोबर भांडण तंटे मारामाऱ्या रोखण्यासाठी व वेळीच पायबंध घालण्यासाठी सोलापूर शहरात जवळपास 23 पोलीस चौक्या उघडण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात असल्यामुळे बहुतांश तक्रारी चे निवारण व्हायचे अडचणीत असलेल्या नागरिकांना तात्काळ पोलीस मदत मिळायची सध्या शहरातील अनेक पोलीस चौक्या 



 कुलूपबंदच आहेत पोलीस चौकी आपल्या भागात असल्याने नागरिक देखील आपली तक्रार फिर्याद नोंदविण्यासाठी पोलीस चौकीत जायचे. आता परिस्थिती बदलली असून नागरिकांना आपल्या तक्रारी फिर्याद व अडचणी बाबत पोलीस स्टेशनला जावं लागत आहे सोलापूर शहरात दोन गटात हाणामारी दगडफेक चोरी घरफोडी अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे नागरिकांना मदतीसाठी अनेकदा डायल 112 वर कॉल करावे लागत आहे सोलापूर शहराचा विस्तार वाढत्या लोकसंख्या मुळे झपाटाने वाढला असून नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशन ला जाणं येणं खूप लांब व जिकरीचे होतं असून अनेक नगर व वस्त्यापासून पोलीस स्टेशन चे अंतर मोठे असून पोलीस स्टेशन लांब असल्यामुळे नागरिकांना आपली तक्रार फिर्याद नोंदवण्यासाठी फार मोठी पायपीट करावी लागत आहे त्याचबरोबर वेळेत पोलिसांची मदत देखील मिळत नसल्याने नागरिकांना फार मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे तरी मा पोलीस आयुक्त यांनी सोलापूर शहरातल्या बंद केलेल्या पोलीस चौक्या पुन्हा नव्याने सुरू करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांनी सोलापूर चे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments