माहिती अधिकार कार्यकर्ता हे भ्रष्ट नेते ,भ्रष्ट अधिकारी, अवैध व्यावसायिक आणि प्रामाणिक अधिकारी सहनशील जनता,उद्योगशील व्यापारी यांच्यामधील एक भिंत.



माहिती अधिकार कार्यकर्ते अधिकाऱ्यांना माहिती मागतात , माहितीमध्ये काही चुकीच, भ्रष्ट वाटलं तर तक्रारी करतात. ते दुरुस्त करतात अथवा कायद्यानुसार चुकीच्या घटनेला, व्यक्तींना, चूक करणाऱ्याला, भ्रष्टाचार करणाऱ्याला योग्य ती शासन होते. 

लोकप्रतिनिधी सारखं अधिकाऱ्यांना जातीवरून, धर्मावरून,आई बहिणी वरून शिव्या देऊन, बेकायदेशीर बाबी करायला कुठलेही RTI कार्यकर्ते कधी सांगत नाही . 

       अधिकाऱ्यांनी आता तरी विचार करावा RTI कार्यकर्त्यांमुळे समाजाची कामे होतात तर भ्रष्ट राजकीय नेत्यांमुळे, भ्रष्ट राजकीय नेत्यांची गुलामगिरी करून त्यांचाच विकास होतो आणि स्वतःचा स्वाभिमान, अभिमान मातीत जातो समाजाचं प्रचंड नुकसान होतं, आता तरी सुधरा आरटीआय कार्यकर्त्यांना, अवैध व्यवसायिकांच्या, भ्रष्ट नेत्यांच्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आणि साथीवरून ,दहशतीवरून - खोटेनाटे आरोप करणे, खोटे गुन्हे दाखल करणे हे बंद करा. कारण ज्यांनी असं केलं त्यांनीच थोबाड सुजेपर्यंत मार खाल्ला भ्रष्ट नेते त्यांच्या घरात घुसले, त्यांनाच थोबाड सुजेपर्यंत मारल, त्यांचा अपमान केला, त्यांना भयानक त्रास दिला, त्यांना स्वतःच्या घरगड्यासारखं वापरल , हे होत आहे , भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट राजकारणी आणि अवैध यांच्यामुळे या भ्रष्ट राजकीय लोकांच्या, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या, अवैध व्यवसायिकांच्या आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या , सच्चे लोकांच्या, कायदेशीर व्यवस्थेच्या जर कोण मध्ये उभ असेल तर ते आरटीआय कार्यकर्ते आहेत 

        विचार करा जेव्हा हेच अधिकारी भ्रष्ट दलाल लोकांना काही लाभ देऊन आरटीआय कार्यकर्त्यांच्या अंगावर सोडत होते किंवा आरटीआय कार्यकर्त्यांना त्रास देण्याची भूमिका काही दलाल भाडे करू लोकांना पैसे देऊन घेत होते तेव्हा याच अधिकाऱ्यांना हे दलाल लोक आपले हितचिंतक वाटत होते आणि आज याच या प्रामाणिक अधिकाऱ्यांना जेव्हा भ्रष्ट      

         राजकारण्यांकडून दहशत बसवून मारलं जातं ,त्रास दिला जातो ,शिवीगाळ केली जाते तेव्हा हे दलाल लोक ज्यांनी या अधिकाऱ्यांपासून लाभ घेतला तेच हे दलाल लोक अधिकाऱ्यांच्या विरुद्ध नकारार्थी बातम्या पसरवत असतात, अधिकाऱ्यांना त्रास होईल अशा बाबी करत असतात, मग अशा दलाल लोकांना या अधिकाऱ्यांनी का पोसल? का सांभाळलं? याचाही विचार आत्ता खुर्चीवर असलेल्या अधिकाऱ्यांनी विशेषता प्रामाणिक अधिकाऱ्यांनी नक्की करावा

       माहिती अधिकार कार्यकर्त्यांची एक मोठी भिंत असल्याकारणाने प्रामाणिक अधिकारी कर्मचारी ,नागरिक हे सुखाने राहत आहेत

       पुन्हा पुन्हा उदाहरणे घडत आहेत आरटीआय कार्यकर्ते यांच्याविरुद्ध खोटे आरोप होतात, गुन्हे दाखल होतात अथवा आरटीआय कार्यकर्ते हे या सर्व प्रकरणातून बाजूला होतात तेव्हा अधिकारी ,कर्मचारी ,नागरिक ,व्यापारी यांच्यावर प्रचंड अत्याचार होतो ,त्रास होतो आणि राजीनामा देणे ,घरदार सोडून दुसरीकडे जाणे, गाव सोडणे, व्यवसाय बंद करणे असले उद्योग होतात तेव्हा विचार करा आपल्याला आरटीआय कार्यकर्ते जवळचे की भ्रष्टाचार करणारे भ्रष्ट नेते, भ्रष्ट अधिकारी आणि अवैध व्यवसायिक व दलाल लोक जवळचे अजूनही वेळ गेलेली नाही

                त्रिवार सॅल्यूट त्या अधिकाऱ्यांना ,कर्मचाऱ्यांना ज्यांनी स्वाभिमान विकला नाही , स्वत्व विकलं नाही, राजीनामा दिला परंतु ताठ मानेने जगले आणि जगत आहेत आणि असे व्यापारी ज्यांनी व्यवहार बंद केला, व्यापार बंद केला परंतु गुलामगिरी पत्करली नाही आणि ते नागरिक ज्यांनी गुन्हे अंगावर घेतले, त्रास भोगला, नुकसान भोगलं परंतु खोट्यापुढे शरणागती पत्करली नाही

 पुन्हा एकदा त्रिवार अभिनंदन आणि आभार भविष्य तुम्हाला कायम अभिमानाने पाहिल आणि इतिहास लढवय्ये म्हणून नोंद घेइल

(असे कुठे घडले असेल तर योगायोग तो समजावे ,कोणत्याही व्यक्ती अथवा घटनेशी याचा काहीही संबंध नाही)

            जय हिंद जय महाराष्ट्र

              (दीनानाथ काटकर)

         एक माहिती अधिकार कार्यकर्ता

Post a Comment

0 Comments