सोलापूर -लोकसभेसाठी (मंगळवारी) सकाळी सातपासून मतदान सुरू होणार आहे. ही सार्वत्रिक निवडणूक निर्भय वातावरणात निःपक्षपातीपणे, विनाअडथळा पार पडावी, यासाठी ८ मेच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत सोलापूर शहरात सार्वजनिक सभा, बैठका घेण्यावर सोलापूर शहर पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. दुसरीकडे पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्रित येण्यासदेखील
निर्बंध घालण्यात आले आहेत. हा आदेश मतदानासाठी घरोघरी जाऊन भेटी देण्यासाठी लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर १६ मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी
मतदान होणार आहे. सोलापूर मतदारसंघाची निवडणूक विशेषतः शहर हद्दीतील मतदान प्रक्रिया पूर्ण होत असताना पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी नागरिकांना मतदान शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र आदेश काढून शहर हद्दीत ८ मे रोजीच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत बेकायदेशीर जमाव जमविणे, सार्वजनिक सभा घेणे किंवा बैठका घेण्यावर निर्बंध घातले असून पाच किंवा त्यापेक्षा अधिक
व्यक्तींनी एकत्रित येऊ नये, असेह आदेश काढले आहेत. पण, घरोघरी जाऊन मतदानासाठी भेटी देणाऱ्यांसाठी हा आदेश लागू असणार नाही मतदारांना भयभीत करणे, त्यांच्यावर दबाव टाकणे असे प्रकार होऊ नयेत शांततेत व निर्भय वातावरणात मतदान पार पडावे या उद्देशाने हा आदे काढण्यात आला आहे. आदेशा चे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारत दंड विधान कलम १८८ प्रमाणे कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस आयुक्तांनी या आदेशातून दिला आहे.
0 Comments